मित्रांनो, राज्यातील १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या बाबतीत एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, १० जिल्ह्यांची यादीही आली असून या १० जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी १३ हजार ६०० रुपयांसह पीक विम्याचे वाटप करण्यास सुरु झाले आहे.
मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या महिन्यांत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या 10 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या दहा जिल्ह्यांतील १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आहे.शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झालेलं होते. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. परंतु आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या पैशांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास हातभार लागणार आहे.
काय आहे सरकारचा निर्णय?
सप्टेंबर व आक्टोंबर २०२२ या कालावधीत राज्यात झालेले अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.