तुमचा विश्वास बसणार नाही, पण एक रेल्वे मार्ग आहे ज्यावर भारतीय रेल्वेला सव्वा कोटी रुपये रॉयल्टी द्यावी लागते. इंग्रजांच्या तावडीतून देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृतकाळ म्हणूनही साजरे केले जातआहे. पण एक रेल्वे मार्ग आहे जो इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झालेला नाही.
भारतीय रेल्वेने अनेकदा प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. या रेल्वेमार्गासाठी इंग्रजांना 1 कोटी 20 लाख रुपये द्यावे लागत आहेत. हा रेल्वे मार्ग अजूनही ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात आहे. भारतीय रेल्वेने हा रेल्वे मार्ग विकत घेण्याचा प्रस्ताव अनेकदा मांडला होता. पण कंपनीने तो वारंवार फेटाळून लावला आहे. ही खाजगी कंपनी आहे.
शकुंतला रेल्वे मार्ग असे या रेल्वे मार्गाचे नाव असून तो महाराष्ट्रात आहे. या ट्रॅकवरून शकुंतलापर्यंत गाडी धावत होती. यामुळे या मार्गाचे नाव शकुंतला असे पडले. महाराष्ट्रातील अमरावती ते मुर्तजापूर हा मार्ग १९० कि.मी. चा असून शकुंतला एक्सप्रेस या मार्गावरून सहा ते सात तासात आपला प्रवास पूर्ण करत असे. सध्या या मार्गावरून शकुंतला ट्रेन धावत नाही. परंतू, स्थानिक लोक ती पुन्हा सुरु करण्याची मागणी करत आहेत. हा रेल्वे ट्रॅक नॅरोगेजचा आहे. चला जाणून घेऊया याचा इतिहास…
१८५७ मध्ये स्थापन झालेल्या किलिक, निक्सन अँड कंपनीने एजंट म्हणून काम करण्यासाठी मध्य प्रांत रेल्वे कंपनी (सीपीआरसी) स्थापन केली. कंपनीने १९०३ मध्ये २ फूट ६ इंच (७६२ मिमी) नॅरोगेज लाइन तयार केली. याचे मुख्य कारण म्हणजे कापूस वाहतूक. विदर्भातील कापूस समृद्ध प्रदेशातून काढलेला कापूस मुख्य ब्रॉडगेज मार्गावरून मुर्तजापूर जंक्शन, तेथून मुंबईपर्यंत नेण्यासाठी हा रेल्वे मार्ग बांधण्यात आला होता. हा कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरला पाठवला जात होता. मुर्तजापूर जंक्शन हे या ट्रेनचे केंद्रबिंदू होते. १९२० मध्ये दारव्हा-पुसद मार्ग तुटला.
१९५२ मध्ये मध्य रेल्वेने सीपीआरसीचा ताबा घेतला. त्यानंतर १९२१ मध्ये मँचेस्टरमध्ये तयार करण्यात आलेल्या झेडडी-स्टीम इंजिनद्वारे ही ट्रेन चालवली गेली. १५ एप्रिल १९९४ रोजी ते बंद करण्यात आले आणि डिझेल इंजिन जोडण्यात आले. शकुंतला एक्स्प्रेस दिवसातून एकच मार्गाने प्रवास करत होती. मध्य रेल्वे ब्रिटिश कंपनीला १ कोटी २० लाख रुपये देत होती.
या रेल्वे रुळावर गेल्यास ब्रिटिश सिग्नल आणि रेल्वेची इतर उपकरणे पाहायला मिळतील. डिझेल इंजिन बसवल्यानंतर डब्यांची संख्याही सात झाली. ट्रेन बंद होईपर्यंत दररोज एक हजारांहून अधिक प्रवासी या गाडीतून प्रवास करत होते.
2020 मध्ये शेवटच्या प्रवासापासून शंकुलता एक्सप्रेस ट्रेन बंद आहे. या ब्रिटिश कंपनीला भारत सरकार दरवर्षी रॉयल्टी देते. परंतु कंपनीने आजतागायत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम केलेले नाही. रेल्वेचे नुकसान झाले आहे.
अशा तऱ्हेने रेल्वेचा वेग २० किमीच्या पुढे वाढविण्यात आलेला नाही. या सगळ्याचा विचार करून गाडी थांबवण्यात आली आहे. अमरावतीचे माजी खासदार आनंद राव यांनी त्याचे नॅरोगेजवरून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर आता काम सुरू आहे.