spot_img
Tuesday, March 21, 2023
ताज्या बातम्याकोरोना काळात सुरू झालेली मोफत रेशन योजना सप्टेंबरनंतर होणार बंद? वाढत्या खर्चाबाबत...

कोरोना काळात सुरू झालेली मोफत रेशन योजना सप्टेंबरनंतर होणार बंद? वाढत्या खर्चाबाबत अर्थ मंत्रालयाने दिला हा इशारा

spot_img

देशात कोरोना (Corona) आला आणि जेथे तेथे देश थांबला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेक जणांना आडकून पडावं लागलं. त्यामुळे कोट्यवधी लोकांना दोन वेळचे अन्न मिळणे देखिल मुश्किल झाले. यावेळी या कोट्यवधी लोकांना आधार देण्याचे काम पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) झाले. यावेळी या योजनेची खरी भूमिका ठरली. मात्र, आता या योजनेच्या वाढत्या खर्चाबाबत अर्थ मंत्रालयाकडून सरकारला इशारा देण्यात येत आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारने योजनेवरील खर्चाची मर्यादा गाठली आहे आणि सप्टेंबरनंतर मोफत अन्न (PMGKAY) किंवा इतर कोणत्याही मोठ्या कर सवलतीच्या योजनेसाठी जागा नाही. केंद्र सरकारने या योजनेला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अन्न अनुदानात 80 हजार कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. त्याचबरोबर तेलावरील कर कमी केल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कारणास्तव अर्थ मंत्रालयाने सरकारला इशारा दिला आहे की, सप्टेंबरनंतर सरकारी तिजोरीत कोणतीही शिथिलता ठेवण्यास जागा उरलेली नाही. सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील आणि सरकारची वित्तीय तूट अनियंत्रित होऊ शकते, असा इशारा अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने दिला आहे.

सरकारवरील खर्चाचा बोजा वाढला
सरकारने चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये अन्न अनुदानासाठी 2.07 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रस्ताव येईपर्यंत मोफत अन्न योजना 31 मार्चपर्यंतच होती. नंतर सरकारने ही योजना सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली. त्यामुळे सरकारचे अन्न अनुदान बिल 80 हजार कोटी रुपयांनी वाढू शकते, असा अंदाज आहे. अंदाजानुसार, जर सरकारने या योजनेला आणखी 6 महिने मुदतवाढ दिली तर खर्च सुमारे 3.7 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, अंतर्गत नोटमध्ये असे म्हटले आहे की आणखी कोणतीही सबसिडी किंवा कर कपात सरकारच्या उत्पन्न खर्चाचे गणित बिघडू शकते. खर्च विभागाने म्हटले आहे की अन्न सुरक्षा असो किंवा तिजोरीची स्थिती असो, कोणत्याही परिस्थितीत पीएमजीकेवाय योजना सप्टेंबरच्या पुढे वाढवण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही.

अनेक योजनांमुळे ओझे वाढले
खर्च विभागाच्या नोंदीनुसार, मोफत अन्नधान्य योजनेच्या मुदतीत वाढ, खत अनुदानात वाढ, स्वयंपाकाच्या गॅसवर पुन्हा अनुदानाची घोषणा, पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात कपात, डिझेल आणि अन्नधान्य तेलावरील कस्टम ड्युटी कमी करण्यासह इतर अनेक दिलासादायक घोषणा अलीकडेच करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे देशाच्या तिजोरिवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान सूत्रांच्या आधारे अशी माहिती मिळत आहे की, सरकारला आता वित्तीय तूट कमी करण्यात अडचणी येत आहेत आणि तुटीचे लक्ष्य गाठणे ही कठीण होत आहे. अशा स्थितीत देशाची वित्तीय तूट गेल्या वर्षीची पातळी ओलांडू नये यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात