पुणे : माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी राज्यपाल कोश्यारी (Bhagat Shingh Koshyari) यांच्या वादग्रस्त विधानावर भाष्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील खासगीत लोकांना सांगतात की त्यांना त्यांच्या राज्यात पुन्हा जायचंय. या कारणांमुळे हे सगळे सुरु आहे का? ते असं मुद्दाम बोलतायत का असा प्रश्न सर्वांना पडतो. राज्यपालांची नेमणूक जे करतात त्यांनी राज्यपाल कोश्यारींना समज देण्याची गरज आहे, असं अजित दादा (Ajit Pawar) म्हणालेत
पालिका निवडणुकीबद्दल हि राज्यपाल कोश्यारी बोललेत. पालिका निवडणुका लांबल्याने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय. निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत. नुसत्या तारीख पे तारीख जाहीर होतायत. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हे सुरु आहे, असंही अजित पवार म्हणालेत.
राज ठाकरेंचे विचार त्यांच्यासोबत माझे विचार माझ्यासोबत आहेत. आमच्या पोटात एक असं नसतं. कुणीतरी काहीतरी बोलतो आणि बेरोजगारी , शेतकऱ्यांचे वगैरे मुद्दे मागे पडतात आणि इतर विषयांवर चर्चा सुरु होते. तसं न होता लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
सीमाभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारने तरतूद करावी. आमच्यावेळी अशी मागणी झाली असती तर आम्ही लगोलग तरतूद केली असती, असंही अजित पवार म्हणालेत.
या आधी अनेकदा नोकरभरती झाली पण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी कधी नियुक्तीपत्रे दिली नाहीत. अलिकडच्या काळात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे रोष कमी व्हावा यासाठी हे होतंय.ही नौटंकी बंद व्हावी, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका केली.