Gram Suraksha Yojana : आज तरुणवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांच्या बचतीचे महत्व रुजले आहे. अनेक जण बचतीसाठी वेगवेगळ्या मार्गांच्या शोधात असतात. तुम्ही यापैकी एक असाल तर शासनाची एक चांगली योजना आहे. यात दररोज 50 रुपये जमा करून तुम्हाला 35 लाख रुपये मिळू शकतात.
ही उयोजना पोस्ट ऑफिसची आहे. तिचे नाव ग्राम सुरक्षा योजना. या स्कीममध्ये तुम्ही रोज 50 रुपये जमा केल्यास तुम्हाला पुन्हा 35 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते, चला या योजनेची सर्व माहिती जाणून घेऊया.
नेमकी काय आहे ग्राम सुरक्षा योजना
जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला 35 लाखांचा पूर्ण लाभ मिळू शकतो. या योजनेत गुंतवलेली रक्कम गुंतवणूकदारांना 80 व्या वर्षी बोनससह उपलब्ध होते. गुंतवणूकदारचे त्यापूर्वीच निधन झाले तर नॉमिनीला ही रक्कम मिळते. तुमचे वय 19 ते 55 वर्षे दरम्यान असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली जाऊ शकते. तुम्ही त्याचा हप्ता 1 महिना, 3 महिने, 6 महिने किंवा वार्षिक आधारावर भरू शकता.
बोनस सुविधा
सदर योजनेत गुंतवणूक करणाऱ्यास 4 वर्षांनंतर बोनस देखील मिळतो. जर कोणी पॉलिसीधारक ज्याला या योजनेत गुंतवणूक करायची आहे तो ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर ही पॉलिसी सरेंडर करू शकतो.
किती मिळेल रक्कम
जर या योजनेत महिन्याला 1,500 रुपये जमा केले, म्हणजेच जर दररोज फक्त 50 रुपये जमा केले तर त्याला योजनेच्या मॅच्युरिटीवर 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.
पूर्ण रक्कम कधी मिळेल?
गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या मुदतीच्या मॅच्युरिटीवर 31 लाख 60 हजार रुपये, 58 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 33 लाख 40 हजार रुपये आणि 60 वर्षांत 34.60 लाख रुपये मिळतील. या योजनेंतर्गत, वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर ते सुपूर्द केले जाते. दुसरीकडे, जर व्यक्तीचे निधन झाले असेल, तर हे पैसे नॉमिनीला दिले जातात.